ही राखीव बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल याप्रमाणे कार्यरत असणार आहे .सदर पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरिता उमेदवार हे इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर संवर्ग – ड मधील पदाकरिता उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
. यामध्ये जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये एकूण पाच राखीव बटालियन तैनात असणार असून , यामध्ये एकूण 5000 जागा निश्चित करण्यात आले आहेत . त्याचबरोबर छत्तीसगड राज्यांमध्ये एकूण चार राखीव बटालियन तैनात करण्यात येणार असून , यामध्ये एकूण 4,000 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .| राज्याचे नाव | IRB ची संख्या | पदांची संख्या |
| महाराष्ट्र | 02 | 2,000 |
| उडिसा | 03 | 3,000 |
| झारखंड | 03 | 3,000 |
| छत्तीसगढ | 04 | 4,000 |
| जम्मु आणि कश्मिर | 05 | 5,000 |
| एकुण पदसंख्या | 17,000 |
त्याचबरोबर झारखंड राज्यांमध्ये एकूण तीन राखीव बटालियन तैनात असणारा असून , यामध्ये 3,000 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत . ओरिसा राज्यामध्ये एकूण तीन राखीव बटालियन तैनात करण्यात येणार असून , यामध्ये एकूण तीन हजार पदांची पदभरती प्रक्रिया राबण्यात येणार आहेत . तर महाराष्ट्र राज्यात एकूण 02 बटालियन तैनात असणार असून, यामध्ये एकूण 2,000 जागेसाठी असे एकूण 17,000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत .
या संदर्भात अधिकृत जाहिरात लवकरच निर्गमित होणार असून सविस्तर जाहिरात https://www.police.gov.in/ या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल .
टिप्पण्या